'यक्षप्रश्न' म्हणजे काय? - Welcome to Swayam Talks
×

धनश्री लेले

‘यक्षप्रश्न’ म्हणजे काय?

महाभारतातल्या एका पर्वात 'यक्षप्रश्न' नावाचा एक सुरेख प्रसंग आहे.
पाणी पिण्यासाठी एका तळ्याशी गेलेले नकुल, सहदेव, भीम आणि अर्जुन एका यक्षाने केलेल्या सूचना न ऐकल्यामुळे मृत्युमुखी पडतात. धर्मराज तळ्यातील त्या यक्षाच्या सर्व प्रश्नांची अतिशय चतुराईने उत्तरे देतात आणि आपल्या सर्व भावांना जिवंत करतात.
पण हे घडलं महाभारतात ! त्या प्रश्नांचा आजच्या जगाशी काय संबंध?
नेमका हाच संबंध उलगडून सांगतायत सुप्रसिद्ध वक्त्या व विदुषी धनश्री लेले!
यक्षप्रश्नाचा हा प्रसंग जरी महाभारत काळातला असला तरी त्याचे संदर्भ आपण आजच्या काळाप्रमाणे बदलायला हवेत आणि आजच्या प्रश्नांवर उत्तरे शोधण्यासाठी त्याचा वापर करायला हवा असे धनश्री लेले यांना वाटते.
आपल्या रसाळ व ओघवत्या वाणीने एखादा कठीण विषय देखील सोपा करून सांगणाऱ्या धनश्री ताईंच्या 'यक्षप्रश्न' या व्हिडीओ सिरीजमध्ये तुम्हालाही तुमच्या काही प्रश्नांची उत्तरे मिळतील अशी आम्ही आशा करतो.

 

Related Video


Trending Now

Other Podcasts

Swayam Recommends

Social Change Makers

Who Followed their Heart

स्वयं मुंबई २०२१